Saturday, 7 March 2015

पडवळपाडा


प्रवासाला निघालो की गाडीतून दिसणाऱ्या सूर्योदयाचा एक फोटो  असणारच…


उन्नत भारत अभियानाअंतर्गत  एक सर्वेक्षण करायला मी खराडे ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या पडवळपाडा या पाड्यावर गेले.  गावात सगळेच शेतकरी पण जिरायती शेतीवर पोट भरत नसल्यामुळे कुठेतरी मजुरी करून घरसंसार चालवणारी कुटुंबे . मुंबईपासून फक्त ६०-७० कि.मी. अंतरावर असणारे हे पाडे; पण जीवनशैलीमध्ये किती विरोधाभास!!
 ही आमची पडवळपाडा टीम…

गावचे पोलिस पाटील यांनी आमचं  स्वागत केल्यानंतर आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली

इथे एकमेव कुटूंब दिसले ज्यांच्या घरातील सुनादेखील किमान दहावी शिकलेल्या आहेत. मोठं सधन कुटूंब म्हटलं तर हेच. गावात कोणाचाही पूर्वीपासून बँक खाते नाहीच आणि असले तरी कधीतरी काही कारणामुळे पतसंस्थेतून कर्ज घ्यावे लागल्यामुळे तिथे असलेले खाते.
क्वचित कोणाच्यातरी घरी TV set, बाकीच्यांकडे साधा रेडीओसुद्धा नाही. टेलिफोन, मोबाईल चा गंध ही नसलेला हा जिवंत पाडा… पण तरीही कुणाच्या चेहऱ्यावर एवढे दु:ख दिसले नाही जेवढे आमच्याकडे internet pack संपल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर लगेच दिसून येते.
वर्षातून एक भाताचं पिक घेणारी ही मंडळी,   फळे सणवाराला केव्हातरी खातील तेपण खिशाला परवडलं तरच. मेस मध्ये जी फळे दररोज न चुकता मिळतात त्यांना हमखास नावे ठेऊन त्यातल्या त्यात "बरं दिसणारं" फळ आपण थोडं नाक मुरडूनच उचलतो त्यावेळी आपल्याला ही जाणीवच नसते की आपल्यासारखे फार थोडे लोक एवढे नशीबवान असतात.

 दुपारी जेवणानंतर जेव्हा आम्ही पुन्हा गावात गेलो तेव्हा या आजी आमच्यासोबत  प्रत्येक घरी आल्या. कारण त्यांची इच्छा होती की आम्ही त्यांच्याही घरी यावं; पण त्यांचं घर कदाचित आम्हाला सापडणार नाही. मग त्यांच्यासोबत गेलो त्यांच्या घरी. कौतुकाने आम्हाला हवी ती सर्व माहिती त्यांनी दिली. 


खूप प्रेमळ असतात गावातील लोक . प्रत्येक घरी आम्हाला जेवण किंवा चहाचा आग्रह होत होता.
 हिमांशू हा या कामात माझा सहकारी होता. 
मराठी बोलता येत नसल्याने तो फक्त नोंदी टिपण्याचे काम करत होता.चांग्याचापाडा  ते पडवळपाडा हा प्रवासपण मजेशीर  होता. दोन्ही बाजूने तवेरा ला दोन मुले लटकून आली.

 आमचं काम संपल्यावर आम्ही निघालो. त्या दिवशीचा हा सूर्यास्त. 



No comments:

Post a Comment