सततची धावपळ, आळसाच्या धुळीने माखलेली रसिकता आणि समाजमाध्यमांवर खर्च केलेला निरर्थक वेळ यांमुळे काही दिवस वाचनापासून दूर राहिले होते. कुठेतरी चुकतंय, काहीतरी हरवलंय असं सतत वाटत होतं पण भवतालच्या गर्दीत मी स्वतःला गुंतवून ठेवल्याने ते काहीतरी काय ते कळत नव्हते. आज कित्येक दिवसांनी एक नवेकोरे पुस्तक हातात घेतले आणि इतके दिवस कुठेतरी हरवलेली माझी मीच मला नव्याने सापडले.